Skip to main content

Posts

थोडसं 'सेव' केलेलं...!

मुली, तू खूप त्रास करून घेतेयेस. जरी तुला वाटतं की तू ठीक आहेस, सोर्टेड आहेस, तरी तसं नाहीये आणि हे तुलादेखील माहितीये. तुझ्या आत खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या तू धड सांगत नाहीस कोणाला. I know it must be hard to accept everything, पण ते शेवटी करावंच लागतं ना. त्याला काही ऑप्शन नसतो. 'काही प्रश्न सोडून दिले कि सुटतात' हे पटतं मला. एवढं सगळं करूनही जर मनाप्रमाणे घडत नसेल, तर तू काहीच करू शकत नाहीस. अशा वेळी त्यातल्या त्यात योग्य डिसिजन घेऊन सोडून द्यावं असं आपलं माझं मत आहे. काळ जातो तशी उत्तरं सापडतात. तू खरंच खूप strong आहेस. हे पश्चात्ताप किंवा दुख: करून काहीच मिळत नाही. बोलायला खूप सोपं आहे माहितेय मला, पण accept करणं अशक्यही नाहीये. बस्स, थोडा वेळ दे. शेवटी 'लिहिणा ऱ्या चा'ही विचार करावा थोडा माणसाने... :) ता. क.: वाचून विचारात पडलेल्यांसाठी - हा खरंतर भला-मोठा SMS आहे एका मैत्रिणीला पाठवलेला... सेंट आयटम्स डिलीट करतेवेळी का माहित नाही सेव करावासा वाटला!

मला 'लंप्या' का आवडतो...

तर माझी आणि लंप्या ची ओळख काही फार जुनी नाही. नुकतीच पंधरा दिवसांपूर्वीची आहे. एका मैत्रिणीने माझी त्याच्याशी ओळख करून दिली. तसा तो आहे माझ्यापेक्षा लहान पण त्याच्यावर लगेच जीव जडला. तो आवडण्याची तशी खूप सारी कारणे आहेत, त्यातली काही आज तुम्हाला सांगायाचीयेत, बाकीची 'टॉप सिक्रेट'! १.  त्याची ओब्झर्वेशंस  : त्याला खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींत जग दिसतं. प्रत्येक पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींवर विचार हा त्याला करायलाच हवा. त्यातून, स्वत:चे असे, काही 'मॅड'सारखे अंदाज बांधायचे आणि मग बाकी संपूर्ण जग कसं 'मॅड' आहे, हे ठरवायचं. २.  त्याचं आपल्या लोकांवर असणारं प्रेम  : तो खरंतर राहतो आजी-आजोबांकडे, म्हणजे आई-बाबा, भाऊ-बहिणी यांच्यापासून दूर. त्याला नेहमी त्याच्या घरच्यांची आठवण सतावत असते. मधेच त्याला आपण त्या सगळ्यांपासून, विशेषत: आईपासून दूर जात आहोत अशी भीती देखील वाटत असते. मग तो त्यांच्या आठवणी जागवायला सुरुवात करतो आणि नकळत एक अदृश्य बंध दाखवतो, ज्याने तो घरच्यांशी बांधला गेलेला आहे. आणि आपल्याला अशी पक्की खात्री करून देतो कि तो कधीच त्यांच्या...

मैत्रीचे ठसे

काही नाती खरंच परिपूर्ण असतात, सर्वदूर असूनही जवळ भासतात, दररोज न बोलताही आठवण काढतात, रक्ताची नसूनही एकमेकांचं जग बनून जातात... क्वचितच भेटतात, पण भेटल्यावर धमाल उडवून देतात, जुन्या आठवणी उगाळून खिदळत बसतात, आणि पुढील भेटीसाठी आस लाऊन धरतात... एकमेकांची उणीदुणी काढतात, एकमेकांच्या जयावर पुन्हा टाळ्या पिटतात, पूर्वी ओढावलेल्या पराजयावर जरा अश्रू ढाळतात, आणि जुने बंध पुन्हा एकदा घट्ट करतात... एकमेकांकडे थोड्याश्या आश्चर्यानेच बघतात, काहीजण कसे बदलले याचा लेखाजोगा मांडतात, तर काहीजण अजूनही कसे अगदी तसेच आहेत हे ताडतात, आणि आपणच आपल्या नात्याचा तोल सांभाळतात... एकमेकांच्या आठवणीत कायम झुरत असतात, पण जेव्हा एकमेकांसोबत असतात तेव्हा एकमेकांचीच बनून जातात, खरंच काही नाती किती परिपूर्ण असतात, आणि हीच नाती परिपूर्ण मैत्रीचे ठसे पावलोपावली उमटवत असतात.... - मनाली साटम     ( ८ ऑगस्ट, २०११ )    

भिगी ज़ुल्फे आणि पुरुष मंडळी!

"झटककर जुल्फ जब तुम, तौलीये से बारीशे आझाद करती हो,  अच्छा लगता हैं...." सध्या ह्या ओळी खुपदा कानांवर पडतात. या ओळींची रचना मला जाम आवडते. प्रसून जोशी ला त्या साठी सलाम! पण मला एका वेगळ्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं, ते म्हणजे समस्त पुरुष वर्गाला मुलींच्या या (केस सुकवण्याच्या), rather किचकट गोष्टीबद्दल एवढं आकर्षण का असतं??? म्हणजे हे मला मान्य आहे कि नुकतीच आंघोळ करून आलेली बाला (ऐकायला जरा विचित्र वाटत ना?) खूप फ्रेश दिसते. तसे तर पुरुष हि फ्रेश दिसतात. मग मुलीन्बाबतीतच  असं का? खरं सांगायचं तर, अजून तरी हा प्रश्न मी माझ्या समस्त "मित्र" वर्गाला विचारलेला नाहीये. त्यामुळे मला खरच माहित नाहीये, कि नॉर्मल (म्हणजे कवी आणि ही सिनेमा वाली मंडळी सोडून) मुलांना अशा केस पुसत बाल्कनी किंवा दारात उभ्या मुलींकडे बघून काही होत असावं.  Self Confession : मी गेली कित्येक वर्षे (जेंव्हापासून स्वत:चे केस स्वत: पुसायला लागले तेव्हापासून) बाल्कनीत उभी राहूनच केस पुसते. आणि अगदी सिनेमात दाखवतात तसे. म्हणजे काही ठरवून वगैरे नाही, पण तीच केस सुकवण्याची साधारणत: पद्धत असते. ...

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

कसाबचा so called वाढदिवस!!!

काल घडलेल्या सर्व घटनांमध्ये " कहर " कोणता असेल तर तो म्हणजे, " कसाबचा वाढदिवस "!!! आणि या वरूनच   कळतं, आपण किती " सजग " आहोत. सगळ्यांना सांगत सुटतो कि अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पसरवू नका. आणि शेवटी तेच करतो. हे असं कसाब-कसाब करून त्याचं महत्त्व आपणच वाढवायचं आणि म्हणायचं कि सरकार त्याला महत्त्व देतंय. एवढ्या साऱ्या लोकांनी त्याचा वाढदिवस " साजरा " केल्याने त्यालाही त्याचा वाढदिवस नक्की कधी असतो याची शंका येईल. ह्यालाच काय ती " irony " म्हणत असावेत. आणि त्याला प्रोत्साहन देणारे हे ' सोशल नेटवर्किंग '! खरच मी स्वत:ला आज सुदैवी समजते कि काल काही अन्य कारणांमुळे मी त्या वेळेला ऑनलाइन आले नाही. नाहीतर माझ्याही हातून (via status & tweet) एक अफवा पसरवली गेली असती. आणि त्यामुळे अजून कित्येक जणांनी त्यावर विश्वास ठेवून त्याला पसरवलं असतं. सजगता माणसाने नक्की कुठे दाखवावी यावर आता विचार करायची गरज आहे. ता. क. : आता वीकिपीडीया वर किती विश्वास ठेवायचा यावर मी विचार करतेय. वृत्तपत्रानुसार एका चेन्नई स्थित बँक अधिकाऱ्याने ते प्रताप...

ना राहिले आज...

ना राहिली पवित्र आज ती गंगा, अन ना राहिला सुंदर तो ताज, परंतु आहे पवित्र आजही प्रेम तिचे, अन आहे सुंदर तिच्या शृंगारातील साज... ना सुगंधी आहे आज हा श्वास, अन ना राहिले आज जग ते धुंद, परंतु आहे सुगंधी आजही हि ओलेती माती, अन करतो मुग्ध आजही ह्या मोगऱ्याचा गंध.... - मनाली ( ता. क. : नवीन पोस्ट्सबद्दल अपडेटेड राहण्यासाठी फेसबुक वरील या ब्लॉगचे पेज जरूर "Like" करा.... :) )