Skip to main content

आत्मसंशोधन!



काही काही वेळेला आपल्याला खरंच कळत नाही की काही गोष्टींबद्दल आपला काय 'stand' असायला हवा आणि काय आहे. It's so confusing!!! I mean, मी अमुक अमुक व्यक्तीला मदत करतेय ती नक्की का करतेय, कोणत्या नात्याने करतेय आणि कोणत्या हेतूने करतेय, हे शोधणं गरजेचं नाहीये का???

मदत करण्याबाबत शंका नाही, ती तर करायलाच हवी. परंतु आपला "stand" शोधणं आत्मसंशोधानाच्या दृष्टीने गरजेचं नाहीये का???

'आत्मसंशोधन' शब्द खरंच जड आहे पण त्यापेक्षाही वजनदार आहे. जेवढं वजनदार तेवढंच कठीण आणि खोल.... ते करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही एखादी कृती करून विसरून गेलात तर ती कृती 'घडवून' आणण्यामागचा उद्देश काय???म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट करण्याआधी विचार करावा. गेलेली वेळ आणि गेलेला शब्द परत येत नाही. पण सध्याच्या काळात वेळ तरी कुठेय, म्हणजे सकाळी सुरु झालेला दिवस रात्री डोळे मिटेपर्यंत कसा निघून जातो कळतच नाही, भले निव्वळ टाइमपास केलेला असो... आणि तसंही सध्याच्या काळात बसून विचार करण्यापेक्षा टाइमपास करणं जास्त रास्त वाटतं. सगळ्यांचं म्हणणं एकच ," कोण एवढी झंझट करणार, आधीच डोक्याला ताप काही कमी आहेत..."

पण खरं सांगायचं तर तोच ताप कमी करण्यासाठी थोडं आत्मसंशोधन करावं आणि ते वाटतं तेवढं कठीण नक्कीच नाहीये.... त्यासाठी फक्त स्वत:ला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. जरा दहा मिनिटं बसून विचार केलं की, मला नक्की काय हवंय आणि ते मिळवण्यासाठी मी जे काही करतेय ते कितपत योग्य आहे.... उत्तरं आपसूकच सापडत जातात. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला खरोखर अगदी actually हव्या असतात आणि आपण बिलकुल त्याच्या विरुद्ध वागत असतो, अगदी नकळत.... सोप्पं उदाहरण द्यायचं झालं तर 'अपेक्षां'चच घ्या ना....

आपण नेहमी म्हणतो,'सगळे माझ्याकडून जरा जास्तचं अपेक्षा ठेवतात' आणि त्यांच्या नावाने बोटं मोडतो पण हा विचार कधीच करत नाही, की दुसऱ्यांच्या अपेक्षांचा विचार करण्याआधी आपल्या स्वत:कडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय ते.... हे शोधलं तर सगळं कोडं कसं अगदी सहज सुटून जाईल, नाही का???

Comments

BinaryBandya™ said…
स्वतःला थोडा वेळ देणे खरेच गरजेचे आहे ..
Manali Satam said…
आणि त्यासाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे.... :)
हं बरोबर आहे, आणि मी कुठेतरी वाचल्याचं आठवतंय, "सद्यपरिस्थितीकडून अवास्तव अपेक्षा, परिणामी नैराश्य."

बाकी, वेळेच्या बाबतीत मुळाशी अगदी अशाच जातीचे प्रश्न ठेवून येथे औपचारिकरीत्या मी लिहिलेला लेख आहे—म्हणावा तितकं साध्य झालं नाही पण.
vaibhav_sadakal said…
आत्मसंशोधन ..... खरोखरच वजनदार शब्द आहे त्यामुळे काय करायचं? कसं करायचं? उपयोग कय? हेतु काय? हे समजेल. पण त्यानंतर आपल्याला स्वयंमुल्यमापन करता आलं पाहिजे.जे काही केलं ते योग्य होतं का? हेतु साध्य झाला का? इथूनपुढे कसं वागायचं? हे ठरवता येईल नाही का?

पोष्ट आवडली. आणि तुमच्या रिलेशनाशिप २ ची वाट पहात आहोत. त्यासाठी शुभेच्छा
Manali Satam said…
खूप आनंद झाला ह्या प्रतिक्रिया वाचून... कोणीतरी आपल्या wavelength वर आहे, याचं सुखही आहे...!!!
@ वैभव : आता खरंच रिलेशनशिप २ चा विचार करते.... :)

Popular posts from this blog

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि जर ते चा

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ