Skip to main content

का कळेना....

कधी कधी खरंच कळत नाही, काय होतंय ते.... पुढेही जाता येत नाही आणि आयुष्य थांबूही शकत नाही..... मग सुरु होतो या दोघांमधला एक खेळ....
विचार करून थकलो तरी थांबत नाहीत, असे विचार यायला सुरुवात होते.... कुठेतरी आपण दिशाहीनतेच्या दिशेने पाऊल टाकतोय असे वाटायला लागते आणि मग स्वत:ला आवरायची धडपड सुरु होते..... काही करून या मायाजालातून बाहेर पडायचे असा पक्का निश्चय केलेला असला तरी समोर मार्ग काहीच दिसत नाही.....
मग मार्ग शोधायची धडपड सुरु होते.....या धडपडीत स्वत:चेही भान राहत नाही..... कुठे लागले का, हे बघायचीही फुरसत राहत नाही..... जखमा राहून जातात तश्याच....
एका अत्युच्च क्षणी थांबावेसे वाटते, जरा वळून मागे बघावेसे वाटते.... थोडाफार लेखाजोगा मांडायची इच्छा होते.......
पण शेवटी येते ती निराशा, कारण आपण पाहतो स्वत:ला निव्वळ आणि निव्वळ काही थेंब ओंजळीत सामावून घेण्याच्या धडपडीत......
आणि मनात येते, " का कळेना....."  

Comments

BinaryBandya™ said…
असे थेंब ओंजळीत सामावून घेण्याची धडपड म्हणजेच जीवन नाही का ??


मस्त लिहिले आहेस ..
Manali Satam said…
धन्यवाद!!!
खरंय तुमचं म्हणणं हेच जीवन आहे, पण ते समजून आणि उमजून घ्यायला थोडा वेळ लागतो एवढंच....
अतिशय सुंदर लेख लिहिलाय ,,,,,,छान
Manali Satam said…
धन्यवाद!!!! तुम्हाला लेख आवडला हे वाचून आनंद झाला......
Manali Satam said…
Thanks a lot Poornima!!!!
vinu said…
kupach sundar manali........
Manali Satam said…
धन्यवाद!!!

Popular posts from this blog

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि जर ते चा

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ