Skip to main content

मला तुझा वेळ हवाय....





आजपर्यंत मी कधीच तुझी मदत मागितली नाही,
तू मात्र करत राहिलास तुझे आशीर्वाद देत राहिलास...

सुदैव काय असते हे मला पाहून लोकांना कळले,
त्यांच्या नकळत ते प्रत्येक क्षणी माझ्यावर जळले...

मला नेहमी वाटत की मला तुझी गरज नाही,
परन्तु तुझ्याशिवाय जग चालते असा माझा गैरसमजही नाही...

मी  फक्त कुठेतरी माझ्या पायांवर उभा रहायचा प्रयत्न करत असते,
तू नेहमी हात पकडतोस म्हणूनच पडण्यापासून वाचत असते...

मी नेहमी ठरवते की तू दिलेल्या या कर्जाचे ऋण मी फेडणार,
तू माझ्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या मदतीशिवाय मी पार पाडणार...

पण अजुन काही ते मला जमले नाही,
मी अशी कशी वागू शकते हेच मला कळले नाही...

पण आज कुठेतरी अपराधीपणाची भावना मनात रुजू लागलिये,
तिच्या नकळत ती माझं मन पोखरु लागलिये...

जमेल का मला कधी तुझे हे ऋण फेडणे ?
की मरतानाही राहिल द्यायचे तुझे हे देणे ?

तुला हवे तसे मी वागत नाही म्हणून तू माझ्यावर रागावाशील का?
माझ्या या आयुष्याच्या वाटेवर माझी साथ सोडून जाशील का?

आज खरी मला तुझ्या मदतीची गरज आहे,
आणि ही एक गोष्ट मी तुझ्याकडे मागणार आहे...

अजुन काही दिवस तुझे आशीर्वाद तू मला दे,
नंतर त्या मोबदल्यात तुला हवे ते घे....

मी तुला नाही म्हणणार नाही,
एवढे  कृतघ्न बनणे मला आयुष्यात जमणार जमणार...

मी आजपासून कृतज्ञ  बनण्याचा प्रयत्न करणार आहे,
त्यानंतर तुझे पांग फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे....

फक्त कही दिवस मला तुझी साथ हवीये...
फक्त कही दिवस मला तुझा  वेळ हवाय...





Comments

माफ करा पण येथील प्रत्येक पोस्ट वाचून काढण्यासाठी मी खेचला जातो आहे, कारण अद्यापदेखील उमगले नाही—बहुधा तुमचे आवडलेले लेखन यास कारणीभूत असू शकते, पण केवळ तेवढेच कारण असण्याबाबत मी साशंक आहे. असो.

वरील काव्यपंक्ति उत्तम.
Manali Satam said…
त्यात माफी कसली मागायची...!!! तुमचे खूप खूप आभार...
मनाली एकदम सुंदर झालीय कविता !!!

I just loved it....

Looking forward to read more poems from you...
Manali Satam said…
धन्यवाद! :)

Popular posts from this blog

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि जर ते चा

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ